Ad will apear here
Next
बोरिवलीच्या समतानगरमधील जिल्हा परिषद मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन


भिवंडी :
भिवंडी तालुक्याच्या पडघा केंद्रातील समतानगर, बोरिवली येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत १५ ऑक्टोबर २०१९ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून युवा कवी मिलिंद जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जेवढे वाचाल, समजून घ्याल, तेवढी प्रेरणा तुम्हाला मिळेल. रोज वर्तमानपत्रे, पुस्तके, कविता, लेख वाचा. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल. वाचनाने ज्ञान वाढते आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर आपण वैचारिक चर्चा करू शकतो. चारचौघांत आपले मत मांडू शकतो. सत्याची बाजू मांडू शकतो. ज्ञान ही आपली मोठी ताकद आहे. त्याच जोरावर आपण शिखर गाठू शकतो,’ असे मिलिंद जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ‘प्रेरणा’ ही कविता सादर केली. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याबद्दल मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, सहशिक्षिका भावना घरत यांनी मार्गदर्शन केले. मराठी साहित्यातील कविता समजाव्यात म्हणून विद्यार्थ्यांना वाचनासाठी १० कवितासंग्रह मिलिंद जाधव यांनी भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांकडून कथा, कविता, लेख यांचे वाचन करून घेतले. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZVQCF
Similar Posts
जि. प. डोहोळेपाडा शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील कोशिंबी केंद्रातील डोहोळेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
समतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा बोरीवली : १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील समतानगर, बोरिवली पडघा येथील समाज विकास मंडळ व समतानगर येथील ग्रामस्थांच्या वतीने ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन बुद्धविहाराच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
डॉ. आंबेडकरांनी पडघा येथेही केला होता पाणी सत्याग्रह भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती आणि तेथे पाणी सत्याग्रहही केला होता. त्या आठवणीला पडघ्यातील नागरिकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त उजाळा दिला.
भिवंडीत फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला सुरुवात भिवंडी : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भिवंडीतील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी भिवंडीतील रांजणोली, शिवनगर, चौधरपाडा, सावाद, मुठवल, सरवली या जिल्हा परिषद

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language